मराठा मंडळ मुलुंड मुंबई - निबंध स्पर्धा २०२२ - विषय : विज्ञानाचे महत्व

गट क्रमांक १

अक्षय दत्तात्रय कलंबेकर 

पारितोषिक :उत्तेजनार्थ 



असेच का अन तसेच का

प्रश्न पडले जर मनाला

अचूक उत्तर मिळेल तुम्हाला

प्रश्न विचारता विज्ञानाला

 

या ओळींप्रमाणे आज आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडे आहे. म्हणूनतर असे म्हणतात की आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. विज्ञानामुळे मानवाच्या जीवनातील दैनंदिन कामे सुलभ अधिक सोपी झाली आहे. विज्ञानाच्या सहाय्यतेने मानवाने बरीच प्रगती केली आहे, अश्मयुगीन काळामध्ये विज्ञानाशिवाय मानवाचे जीवन अतिशय खडतर होते. परंतु माणवाने प्रगती केली शोध लावले आणि संथ गतीने का होईना त्याने विज्ञान युगात प्रवेश केला. विविध शास्त्रज्ञानी तयार केलेले आविष्कार, त्यांनी लावलेले शोध त्यांना आपण बघतो आणि त्यांचा वापर सुद्धा करतो.

 

सध्याचेच उदाहरण घ्यायच म्हंटले तर २०१९ मध्ये COVID -19 नावाच्या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगाला ग्रासले होते. त्यामुळे अनेकांचा जीव सुदधा गेला परंतु आपण काही लोकांचे प्राण वाचवू देखील शकलो. या साथीच्या काळात यापासून संरक्षण व्हावे यासाठी वापरले जाणारे मास्क, सॅनिटाईझर, लस इत्यादी गोष्टी विज्ञानामुळेच आपल्या उपयोगात आल्या.

 

आजकालच्या आपल्या दैनंदिन  वापरातल्या आपल्या आवडत्या गोष्टी म्हणजेच दुरदर्शन मोबाईल, वीज, गीजर . या सर्व गोष्टी विज्ञानामुळेच आपल्याला मिळाल्या आणि यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोंन हा सुद्धा विज्ञानामुळेच आस्तित्वात आला.तसे स्मार्टफोनचे फायदे अनेक आहेत. तुम्ही कोणालाही आपतत्कालीन स्थितीत संदेश पाठवू शकता, व्हिडिओकॉल लावू शकता. विविध प्रकारची माहिती  मिळवू शकता. एकांदरित पहायला गेले तर विज्ञानाने आपले जीवन बहुतांश सोपे केले आहे. त्यामुळे आपल्याला जी कामे करण्यास भरपूर वेळ लागत तीच कामे आता फक्त एका क्लिकवर होतात. उदा. पत्र पाठवणे, आता तर लोकं लग्नाची पत्रिका सुदधा मोबाईलवरच पाठवतातविज्ञानाने आज ऐवढी प्रगती केली आहे ज्यामुळे आता असे कोणतेही क्षेत्र उरले नाही जेथे विज्ञानाचा वापर होत नसेल. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे 'शिक्षण' आपण सर्व विद्यार्थी आहोत . आपण शिक्षण घेतो बरोबर ना ! आपल्याला शिकवण्याची पदधत म्हणजे खडू, फळा डस्टर इत्यादी गोष्टी पण आता त्याचेच रूपांतर स्मार्ट क्लास पदधतीत झाले आहे. चित्र पाहून शिकल्यामुळे मुलांना आनंद मिळत आहे. विज्ञानाने आपल्याला कशी साथ दिली याचे म्हणजे कोरोनाच्या काळात शाळा बंद कराव्या लागल्या परंतु मुलांचे शिक्षण उदाहरण थांबू नये त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आली यामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. जी मुले काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नव्हती त्यांना याचा इंटरनेट, कम्प्युटर याचा खुप उपयोग आला. हे सर्व विज्ञानामुळे घडले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

 

आपला भारत कृषिप्रधान देश आहे. भारत ज्या क्षेत्रात प्रधान आहे त्या क्षेत्रात विज्ञानाचा उपयोग होणार नाही असे होणारच नाही. सर्व प्रथम शेती करण्याची जुनी पदधतीची जागा तंत्रज्ञानाने घेतली. यामुळे  शेतकऱयांना नफा झाला. विविध शेती करण्याच्या पद्धती शोधल्या गेल्या. त्यामुळे पिकांच्या गुणवत्तेत उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. शेतात काम करण्यासाठी विविध यंत्रे तयार केली गेली त्यामुळे मनुष्य बळ वाचले.

 

आजकाल तर शेतातील तापमान आर्द्रत मोजण्यासाठी सेन्सर वापरले जात आहेत. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ही विज्ञानाचीच देण आहे असे म्हणावे लागेल. 

विज्ञान ठरले वरदान

अनेक जीव वाचवू शकलो

असाध्य रोगांवर

प्रतिबंध लावून जिंकलो.

 

मानवाला कधीतरी वैद्यकिय मदत लागतेच, वैद्यकिय क्षेत्रात तर विज्ञान वरदानच ठरले आहे. यामुळे आपण असाध्य रोगांवर प्रतिबंध लावून त्यांवर उपाय शोधू शकलो. पूर्वीच्या काळी अश्या गुंतागुंतीच्या आजारावर  उपचार   नसल्या कारणाने अनेक लोक मरण पावत असत. अगदी कोरोना महामारीमध्ये जशी स्थिती होती अगदी तशी परंतु विज्ञानाच्या मदतीने आपण त्यावर सुदधा लस शोधली आणि अभिमानास्पद बाब आहे की ही लस भारताने शोधली. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे) कर्करोगासारख्या भीषण आजारांवर सुदधा आज वैद्यकीय क्षेत्रात काही औषधे उपलब्ध आहेत. भले हा रोग पुर्णपणे बरा झालेला नसला तरी यावर वैज्ञानिक अतिशय मेहनत करित आहेत.

 

आपल्या दैनंदिन वापराच्या महत्त्वाच्या मोबाईल वस्तू विविध उपकरणे दुरदर्शन, विज्ञानाने उपकरणाच्या क्षेत्रात देखील आपल पुरेपुर योगदान दिले आहे. यामुळे जगाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत संदेश पोहोचवणे हे काही सेकंदांचे काम आहे. कोणी परदेशात असला तरी तो आपल्याशी संवाद साधू शकतो. आपण आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल लावून त्यांना बोलू पाहू शकतो. आपल्या कुटुंबांशी दूर राहण्याची चिंता न करता आपली स्वप्न आपण पुर्ण करू शकतो.

 

अंधश्रद्धा निर्मुलन करु, ज्ञानाचा करू, ज्ञानाचा वसा धरू जिज्ञासा वृत्ती धारण करु, विज्ञानाचे पर्व साजरे करू. आज भारत विज्ञानाच्या मार्गावर पुढे जरी जात असला तरी आजही भारताच्या काही खेडे गावांमध्ये लोकांच्या मनात अंधश्रद्धा रुजली आहे. त्यांच्या मनातून आपण जोपर्यंत अंधश्रदा मुळापासून काढून  फेकून देत नाही तोपर्यंत घराघरात विज्ञानाचा दिवा पेटणार  नाही. आपले पुर्वज आपल्याला सांगतात की डावीकडे पाय करून झोपू नये परंतु याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की डावीकडे पाय करुन झोपल्या मुळे आपल्याला हदयाला रक्तपुरवठा नीट होत नाही व त्यामुळे आपल्याला अनेक आजरांना सामोरे जावे लागते. त्याचप्रकारे उघड्या डोळ्यांनी सुर्यग्रहण पाहू नये परंतु  याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की उघड्या डोळ्यांनी सुर्यग्रहण पाहील्यामुळे आपल्य डोळ्यांना इजा होऊ शकते डोळ्यांचे आजार देखील होऊ शकतात. अशाप्रकारे प्रत्येक अंधश्रद्धेच्या खाली एक वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला असतो

 

जुन्या काळात पुरेशी वाहतुक सुविधा नव्हती पुरेशी वाहने सुद्धा नव्हती, त्यामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी अनेक दिवस लागत असत, परंतु आज आपल्या प्रवासासाठी बस, ट्रेन, कार, मोटार बाईक, विमान इत्यादी सर्व वाहनांमुळे आपला प्रवास अधिक सोपा व मनोरंजक झाला आहे. विमानामुळे आपण जग फिक शकतो आणि भारत किंवा जगाच्य कोणत्याही कोपऱ्या मध्ये सुरक्षित प्रवास करू शकतो तेथील निसर्गसौंदर्य अनुभवू शकतो. विज्ञानामुळे आज अनेक वाहने तयार होत आहेत. हेच संशोधन पुढेही चालू राहिल याची मला खात्री आहे.विज्ञानाने आपल्याला सुखसोयी देण्यामध्ये कुठेही कसूर केला नाही उलट त्याने आपले जीवन सुखकर बनवले.

 

प्रत्येक देशासाठी आपली संरक्षण व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते कारण तीच त्या देशाला संरक्षण प्रदान करते. यामध्ये विविध शस्त्रास्त्रे बनवली जातात, विज्ञानाच्या सहाय्याने देखील विविध शस्त्रास्त्रे प्रत्येक देश बनवत आहे. DRDO ही सौरक्षण व्यवस्थेसोबत काम करणारी संस्था आहे. या संस्थेची ५२ प्रयोगशाळा DRIO ने टॉरपीडो वरणास्त्र ही दोन शस्त्र तयार केली आहेत, ती DRDO च्या प्रयोग शाखेत तयार केली गेली. ही शस्त्रे २०२० मध्ये नव दलाला प्रदान करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आज आकाशाएवढ उंची गाठली आहे. आकाशावरून आठवले, विज्ञानामुळे अवकाशातील म्हणजेच आंतराळातील विविध रहस्य आपल्या समोर आली आहेत. आंतराळावीषयी माहिती गोळा करण्यासाठी अवकाशयान अंतराळ्यान इत्यादी गोष्टी आंतराळात पाठवण्यात आले आहेत. मंगलयान, चंद्रयान- , १०८ उपग्रह मिशन इत्यादी भारतीय आतंराळ संशोधन संस्थेने (ISRO) ने मिळवलेले यश आहे. अंतराळाविषयी  माहिती गोळा करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. विज्ञानाने आपल्याला खूप काही दिले. त्यामुळे जीवनामधील गुंतागुंती बरिचशी कमी झाली आहे. परंतु प्रश्न पडतो तो विज्ञानाचा उपयोग योग्य मार्गानेच करावा नाहीतर विज्ञान हा वरदान नाहीतर शाप सुद्धा ठरू शकतो. मी आपल्या देशातील सर्व पूजनीय शास्त्रज्ञाना वंदन करतो.

 

विज्ञानाने आपल्या जीवनात एक महत्त्वाची भुमीका नेहमीच बजावली आहे. माझ्या जीवनामध्ये विज्ञानाला माझा मित्रच मानला आणि विज्ञानाशी  माझे घट्ट  नाते पडले विज्ञाना सोबत शिकत असतानाच वेळ कसा गेला हे मला कळलेच नाही. विज्ञानाचे सर्वांच्या जीवनात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तुमचे माहित नाही पण मला पुढे पुढे जाऊन शास्त्रज्ञ व्हायला नक्कीच आवडेल.