मराठा मंडळ मुलुंड मुंबई - निबंध स्पर्धा २०२२ विषय

गट क्रमांक २

ऋतुराज जोगेंद्र गावित    

पारितोषिक : तृतीय क्रमांक  (विभागून)



-: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव :-

 

किती हा आक्रोश झाला,

किती रक्ताचा नदया वाहल्या,

सडा पडल्या मृतदेहाचा,

तेव्हा स्वातंत्र्याचा उगम झाला

 

भारत हा देश विविध जाती-जमाती, संस्कृती, भाषेचा देश आहे. भारताला स्वतंत्र्य मिळाले ते केवळ फक्त स्वातंत्र्य विरांमुळे. ज्या वेळी इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हा प्रत्येक नागरिक स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत होते. त्या सर्वांचे स्वप्न केवळ त्या बलिदान दिलेल्या वीरांमुळे साकार झाले.  ज्या वेळी स्वातंत्र्याचा मला विचार येतो तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराज, विरांना झाशीची राणी, महाराणा आठवतात. पुढे मग स्वातंत्र्याची मशाल  ज्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, ज्योतीराव, सावित्रीबाई फुले, विर सावरकार अनेक अनाम वीर!

 

भारत हा देश वेगवेगळ्या संस्कृतीचा देश आहे आणि आपण २०२२ व्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय याचा प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. भारताने सर्व प्रकारात विकास केला आहे. शैक्षणिक, उदयोग, क्रिडा, शेती, विज्ञान, सौंदर्य स्पर्धा इतर काही. चला मग भारताने कुठे आणि कसे प्रगती केले ते बघुया.

 

भारताला स्वतंत्र्य मिळाले त्या वेळी सर्व देशांना वाटले की हा देश प्रगती करू शकणार नाही पण आम्ही कोणा पेक्षा कमी आहोत का! आम्ही केवळ प्रगती नव्हे तर खुप काही शिकवले सुद्धा आहे. विज्ञानाची प्रगती तर केवळ पृथ्वीवर नव्हे तर चंद्रावर व मगळावर प्रर्यंत केली आहे. भारत हा प्रथम देश बनला ज्याने प्रयत्नात मगळावर यशस्वी स्वारी केली. आम्ही चंद्रावर ही गेलो आणि अतंकराळात ही गेलो आणि तिथे सुध्दा भारताचा गौरव करून दाखवला. 'सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा' असे शब्दात सर्व देशाना दाखवून दिले कि आम्ही तेच जे दिडशे वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होते. इंग्रज्यानी आम्हाला पिंजऱ्यात  कैदी जरी केले पण त्यांनी आमच्या स्वप्नांना कैदी केले नाही. आम्ही कोणाशी कमी नाही हे दाखवून दिले. 'शून्य' हा अंक ही आम्हीच म्हणजे 'आर्यभट्टानी' शोधून जगाला दिले.

 

भारत हा देश कृषीप्रधान देश आहे हे सर्वाना माहित आहे. म्हणुनच जो व्यक्ती सर्वांचे पोट भरतो त्याला आम्ही देवता मानतो. भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवात जर शेतकप्याचे नाव घेतले तर हे चुकीचे होईल. देशाच्या सिमेवर लढणारा सैनीक ज्या वेळी लढता लढता मरतो तेव्हा सुध्दा तो केवळ 'भारत माता की जय' असे बोलुन मरतो. भारताला स्वतंत्र्य भेटल्या नंतर सुद्धा अनेक देश आमच्यावर हल्ला करतात पण आमचा 'सैनीक दादा त्या प्रत्येक वाराचा, हल्ल्याचा बचाव करून आम्हाला भारत माताला वाचवतो. 'जय जवान जय किसान' अश्या शब्दात आम्ही त्या सर्व सैनिकांचे शेतकऱ्यांचे आभार मानतो.

 

भारताच्या अमृतमहोत्सव ज्यामुळे आपण साजरा करतोय ते म्हणजे लाखो अनाम वीर. झाशीच्या राणीने ज्या वेळेस बोलले की 'मी माझी झाशी देणार नाही त्यावेळी त्या काळातील प्रत्येक वीर सैनिक त्या विराना च्या मागे उभा राहिला.

 

“स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना ज्यानी केली, टिळकांच्या शब्दांना  सारी इंग्रज ही घाबरली ! लोकमान्य टिळक यानीच भारतात गणेश उत्सव ही आणला. भारत हा देश या सर्व वीरांमुळे  घडला. भारत देश केवळ शेती प्रधान नाही तर तो देश उद्योगा मध्ये सुध्दा पुढे आहे. आम्ही कित्येक तरी वस्तु दुसऱ्या देशाना पाठवतो. आम्ही आर्थीक स्थितीत  ५ व्या स्थानावर २०२२ आलो. हे दाखवुन दिले ते सर्व त्या उद्योजकांनी.   

 

भारत हा देश क्रिडा मध्ये नवे-नवे विक्रम बनवत आहे भारताने केवळ क्रिकेट मध्येच प्रगती केली नाही. आम्ही अॅथेलिटीक्स, बॅडमिंटन अनेक क्रिडा प्रकारात प्रगती केली. एम.सी. मेरी कॉम हीने दाखवून दिले की महीला केवळ स्वयंपाक घरात काम करण्यासाठी नाही. तिने बॉक्सींग मध्ये भारताला अनेक पदके मिळवून दिले. वेळा विश्वविजेती बनणारी ती संपूर्ण पृथ्वीवर एकमेव व्यक्ती आहे. पि.व्ही सिंधु हीने ऑलिम्पिक मध्ये भारताला   पदके मिळवून दिले आहे. २०१९ साली तीने विश्वविनाचे स्थान पटकावले. २०२१ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक भारताने एकुण पदके जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुध्दा ६० पदकाच्या वर पदके भारताने जिंकले हे गौरव करणारी बाब आहे. कब्बडी चे सर्व विश्वकप भारताने जिकले आहे. हॉकी तर आमचा राष्ट्रीय खेळ तिथे सुध्दा आम्ही मागे नाही.

 

भारताने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली. क्रिडा, विज्ञान व तसेच सौदर्य स्पर्धेत सुध्दा भारताने अनेक किताबे पटकावली. भारताने आता पर्यंत मिस वर्ल्ड, मिस युर्निवस असे क्रमांक पटकावले आहे. भारतीय महिला यांनी प्रत्येकवेळी भारत देशाचे नाव आतंरराष्ट्रीय स्थाळावर आणले आहे. भारताने संपूर्ण जगाला दाखवुन दिले आहे की आम्ही कधीही कोणत्या ही देशावर प्रथम आक्रमण केलेला नाही हा पण जर कुणी आमच्या वर हल्ला केला तर आम्ही त्याला सोडले नाही. आम्ही प्रत्येक वेळी शांतता प्रधान करतो. भारतात मानवता, एकता बंधुतता  नांदते. आम्ही प्रत्येक माणसाला माणसासारखी वागणुक देतो. आम्ही एकताचे शक्ती दाखवुन देतो. दोन वेगळ्या धर्माचे लोक केवळ भारतात राहत नाही तर अनेक धर्माचे लोक एकत्र राहतो.

 

भारत देश ही संतांची पवित्र भुमी आहे. इथे जन्मलेले सर्व संतानी केवळ एकच मार्ग दाखवला तो म्हणजे मदतीचा, मानवतेचा. प्रत्येक प्राण्यांवर प्रेम करा असे वीचार आमच्या मध्ये आहे. भारतात अनेक बोली भाषेचे लोक राहतात. त्या सर्व बोली अतिशय साखरे सारखे गोड आहे. भारताच्या स्वतंत्र्य काळात असे अनेक साहित्यीक होते ज्यांनी देशासाठी तुरुंगवास सुध्दा सहन केला. ज्या वेळेस इंग्रज आमच्या वर राज्य करत होते तेव्हा अनेक विरानी स्वताचे बलिदान दिले. केवळ मोठी माणसे नव्हे तर लहान मुलांनी सुध्दा स्वातंत्र्य लढयात योगदान दिले. नंदुरबार जिल्हयातील ‘शिरीषकुमार' या लहान मुलाचे बलिदान सुध्दा भारत विसरणार नाही. भारताचा ध्वज घेऊन 'भारता माता की जय' बोलताना इंग्रजांनी त्याच्या वर गोळीबार केला.

 

आम्ही भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  'हर घर तिरंगा' ही मोहीम अतिशय चांगल्या रितीने पार पाडली. काही लोकांकडे घर नाही पण भारताचा ध्वज फडकवण्यासाठी हात आहे हे दाखवून दिले. ज्या वेळी संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त होते तेव्हा आमच्या वैज्ञानिकांनी अनेक औषधी संपूर्ण जगाला दिले. आम्ही क्रिडा, विज्ञान अनेक क्षेत्रात देशाचे नाव गौरव करत आहे.