मराठा मंडळ मुलुंड मुंबई - निबंध स्पर्धा २०२२ विषय : विज्ञानाचे महत्व


गट क्रमांक १

गौरी तुषार तावडे       

पारितोषिक : प्रथम क्रमांक


विज्ञानातूनी जन्म आमुचा

अन् रस्ता रहस्यांचा

मार्ग तो प्रगतीचा

आनंददायी चमत्काराचा.

 

अशी ही विज्ञानाची महती आहे. आजचे हे विज्ञानाचे युग म्हणजे रहस्यांचे, शोधांचे चमत्कारांचे युग आहे. आज विज्ञानाने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. पृथ्वीवरील मानवाला मिळालेले खरे वरदान म्हणजे विज्ञानच.

 

विज्ञानाने केलेल्या क्रांती अद्भुत विलक्षण आहेत. त्यामुळेच या युगाला ' विज्ञान युग' असेही म्हटले जाते. आपली जीवनशैली विज्ञानामुळे सुखकर व आरामदायी झाली आहे. आपण विज्ञानाशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. विज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. संस्कृत भाषेत एक सुंदर सुभाषित आहे. ते आहे कि विज्ञान हा मानवाचा प्रभावी डोळा आहे, एखादा माणूस जर त्याचा वापर करत नसेल, तर तो खऱ्या अर्थान आंधळा आहे.

 

पूर्वीच्या काळी, माणूस रानटी जीवन जगायचा. गुहेत राहायचा. कच्चे मांस खायचा . अंग झाकण्यासाठी पानांचा वापर करायचा. त्यानंतर तो हळू हळू शिकू लागला प्रगती करू लागला. त्याने आगीचा, चाकाचा वीजेचा शोध लावला.  वीजेचा शोध ही विज्ञानातील खूप भरारी आहे. हि भरारी ज्या संशोधकाने सर्वात पहिल्यांदा घेतली तो म्हणजे थॉमस एडिसन! त्याच्या मते कोणताही शोध लावण्यासाठी %   बुद्धिमत्ता व ९९% चिकाटीची गरज असते. 'अनुमान, निष्कर्ष, पुन्हा पुन्हा प्रयोग ' हे त्याच्या वीजेच्या शोधाच्या यशामागचे रहस्य होते. विजेमुळेच पंखा फिरतो , प्रकाश मिळतो

आपले जेवण बनते. विजेच्या शक्तीवर अनेक कारखाने चालतात. कमीत कमी वेळात जास्त काम करणे विज्ञानामुळे शक्य झाले आहे. विज्ञानात असंख्य लोकांना रुची असते. दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही.

 

सकाळी उठल्यावर आपल्याला आंघोळ करण्यासाठी गीझरचे गरम पाणी लागते. संध्याकाळी बाबा कचेरीतून दुमून - भागून आल्यावर लावला जाणारा पंखा किंवा .सी.. रात्रीचा काळोख नष्ट करण्यासाठी लागणारे दिवे- हे सर्व विज्ञानच तर आहे ! पूर्वीच्या काळी, जर एखादया माणसाचा मृत्यू झाला तर ती बातमी कळवायला कित्येक दिवस लागायचे, पण आज आपण ते काही सेकंदातच कळवू शकतो. पूर्वी, लोकांना पायी प्रवास करावा लागायचा. आज आपण ट्रक, ट्रेन, जहाज, विमान यांच्या मदतीने लांबचे अंतर थोडक्या वेळात गाठू शकतो. त्यामुळे गैरसोयही होत नाही. व्यवसायातही विज्ञानाचा मोठा वाटा आहे. आपण हवामान व नैसर्गिक आपत्तीची माहिती विज्ञानामुळे मिळवू

शकतो. आपल्या देशातील अनेक घडामोडी आपल्याला विज्ञानामुळेच काही सेकंदात कळतात!

 

टीव्ही, चित्रपट रेडिओ यांच्या शोधामुळे आपले मनोरंजनही होते ज्ञानही प्राप्त करता

येते. अंधश्रद्धेची खरी रूपे ओळखता येऊ शकतात. दूरदर्शनमुळे देश-विदेशातील दृश्य पाहता येऊ शकतात.

 

वैद्यकीय क्षेत्रातही विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. पूर्वी, लोक डेंग्यू, मलेरिया, प्लेग, कॉलरा अशा आजारांमुळे मृत्युमुखी पडायचे. पण विज्ञानामुळे त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. एक्सरे द्वारे शरीराच्या आतील भाग पाहता येतात. त्यामुळे आजाराचे निदान लवकर होऊन गंभीर रोगांपासून बचावता येते. एक्सरे, सिटी

स्कॅन, एमआरआय, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी अशा आधुनिक पद्धतीमुळे आजाराचे निदान होऊन योग्य उपचार करता येतात. रोगांवर रामबाण औषधांमुळे मात करता येते. याचे उत्तम म्हणजे कोरोना विषाणूवर तयार केलेली लस. विज्ञानामुळे शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी कृषी साधने म्हणजेच कापणीचे यंत्र, नांगरणी यंत्र, ट्रैक्टर अशा यंत्रांची निर्मिती होऊ लागली. यांचा उपयोग करून शेतकरी आपला पैसा व वेळ वाचवतो. उत्पादनाची क्षमता वाढते. ओसाड जमिनीवर नंदनवन फुलते.

 

अत्याधुनिक यंत्रांमुळे ज्ञानाच्या शाखा विस्तारल्या आहेत. सातासमुद्रापलिकडील लोक जवळ आले आहेत. विचारांची देवाणघेवाण साधू होऊन प्रगती होऊ लागली आहे. संगणकाच्या २१ व्या शतकात दळणवळण माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे. विज्ञानाचा आणखी एक चमत्कार म्हणजे संगणक ! संगणकाने लोकांना जवळ आणण्याचे महान कार्य केले आहे. इंटरनेट संगणक ही माणसाला मिळालेली देणगीच आहे ! आपण -मेल पाठवून जगातील कुठल्याही माणसाशी संपर्क शकतो. आपण बाजारात जाता घरबसल्या खरेदी करू शकतो.

 

वीजेचे बील, पाण्याचे बील, बँकेची कामे आपण घरबसल्या करू शकतो. रेल्वेचे तिकीटही काढू शकतो. अशा प्रकारे  संगणक आपला सेवकच ठरला. कोरोनाच्या काळात, विद्यार्थी व नोकरदारांसाठी तो देवदूतच ठरला! अबालवृदघांचे मनोरंजनही त्याने केले. मोबाईल ही संदेशवहनाची खाणच आहे! संदेशवहन होऊन खूप प्रगती झाली. बोटाच्या एका क्लिकवर आपण माहिती प्राप्त करू शकतो.

 

'आकाशापासून पाताळापर्यंतचे अंतर आपण विज्ञानाच्या मदतीने मापू शकतो. मानवाने भूमीसारखेच सांगर अंतराळावरही वर्चस्व मिळवले आहे. अथांग सागराचा तळ हे आधी गूढ होते पण पाणबुड्यांनी तळाला पिंजून काढले. अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडून मानवाने अंतराळातही वर्चस्व गाजवले आहे. चंद्रावर पाऊल ठेऊन तो गप्प बसता विविध ग्रहांवर गमनाचा प्रयन्त करतोय. देशाच्या सुरक्षेसाठी अनेक हत्यारे तयार केली जात आहेत. सुईपासून अगदी विशाल जहाज, विमान, रॉकेटपर्यंत ! शिक्षण क्षेत्रातही विज्ञानाचा मोठा वाटाआहे. छपाईयंत्राची निर्मिती हि शिक्षण क्षेत्रात केलेली

मोठी क्रांती आहे. ज्ञान प्रसार प्रचाराचे काम यामुळे झाले. छपाईयंत्रातून लाखो प्रती छापून वितरणासाठी पाठवल्या जातात.

 

विज्ञानाने औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी कामगिरी बजावली आहे. ज्ञान प्रसार प्रचार विज्ञानामुळे झाला. विज्ञानामुळे आपले जीवन आरामदायी झाले आहे. विज्ञानाने अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाशाचा उजेड सर्वत्र पसरवला आपल्या जीवनाला गती दिली.