मराठा मंडळ निबंध स्पर्धा २०२२ -
विषय : कोरोनाने काय शिकवले

गट क्रमांक २

नेहा राजाराम पारकर 

पारितोषिक : व्दितीय क्रमांक 


कोरोनाने काय शिकवले ?

 

अजाण, पाहुणा असा भारतात आलेला विषाणू म्हणजे 'कोरोनाज्याने अवघ्या जगात  संकरित आजार पसरवण्याचे कार्य केले. या विषाणूला मायक्रोस्कोप मधून पाहिल्यावर 'मुकूट’ (crown) सारखी आकृती दिसते आणि त्या कारणाने लर्टिन भाषेतून कोरोना हे नाव देण्यात आहे.

 

मागील दोन वर्षापूर्वी कोरोनाची साथ आली आणि त्यामुळे संपूर्ण जगात लाकडाउन लागला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळ काही बंद झाल होत. कोणाकडेही जायचं नाही, यायच नाही, कुणीही हात मिळवायचा नाही, थोडक्यात काय तर स्वतःला घरातं बंदिस्त करून घ्यायच. अवघ जग स्तब्ध झाल्यासारखा वाटतं होत.

 

कोरोना काळात प्रत्येकाला बरे वाईट अनुभव आले. लोकांनी या काळात एकत्र कुंटूंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून आनंदी तणावमुक्त जीवन जगण्याचा अनुभव घेतला. लॉकडाऊनच्या काळात लोकांना कुटूंबातील व्यक्तिंनी कोणत्याही परिस्थित एकत्र असावे याची जाणीव झाली आणि त्यामुळे नात्यातील दूरावा दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली. कोरोनाने काळा गोरा, गरीब-श्रीमत,असा कोणताही भेदभाव करना प्रत्येकालाच स्वच्छता निरोगी जीवन कसे जगायचे ते शिकवले.

 

कोरानाने जगाला आणि प्रत्येकाला सर्वात मोठा संदेश दिला तो म्हणजे " शोशल डिस्टनसिंगसमाजातील कोणत्याही व्यक्निशी संवाद साधताना सुरक्षित अंतर राखूनच साधावा, सुरक्षितता राखणे स्वावलंबी होणे अशा अनेक बाबी आपण या कोरोनाकाळात शिकलो. किनाही जवळचे नातेवाईक असले, तरीही त्यांना' हस्तांदोलन' न करता आपली जुनी नमस्कार" ही परंपरा रूजवण्यास भाग पाडले. बचतीचे महत्त्व पटवून दिले. बचत म्हणून कंजूषपणा नव्हे, तर भविष्यासाठी केलेली तरतूदच होय' त्यामुळे दिलेल ती वस्तू विकत घेणे, वायफळ खर्च करणे यासारखे अनेक खर्च बंद करण्यास भरीस पाडले. कधी नवीन सिनेमा पाहायला जाणारे आपण हे तर  तेव्हा स्वप्नवन झाले होते. आपल्याच सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये साधा क्रिकेटही खेळता येत नव्हता. ना नवीन सिनेमा ना नवीन नाटके येत होती. आपल्या जीवनातून मनोरंजन ह द्दपार झाले होते. दर शुक्रवारी 'फर्स्ट डे फर्स्ट शो' तर दूरच राहिला, फार तर घरी बसून टिव्ही पाहणे, पत्ते खेळणे, कॅरम खेळणे अथवा सापशिडीचा डाव मांडणे या व्यतिरीक्त आपण कसलाही मौज उरली नव्हती. आपल्या नातेवाईकांना भेटणे, पार्टी करणे, फॅमिली सोबन फिरायला जाणे हे सुद्धा आपण करू शकलो नाही. इतकेच नाही तर रोजच्या भाजीवाल्यांशी केली जाणारी घासाघीस,  कामवाल्या मावशीबरोबर मारणाच्या गप्पा हे सगळे देखील आपल्या आयुष्यातून गायब झाले होते.  ऑफिसचे काम घरीच बसून करावे लागल्याने काम करण्यास उत्साह येत नव्हता. एकमेकांच्या मदतीने, मिळून मिसळून काम करता येत नव्हते. पूर्वी कोणत्या हॉटेलात जेवायला जायचे, कोणत्या मौल मधून शॉपिंग करायची हे आपल्या हाती होते पण ऑनलाईनच्या जगात हे सगळे हट्ट घरबसल्या पूर्ण होत होते. ऑनलाईनच्या या जगात भाज्या धान्य हे सुद्धा ऑनलाईन  मागवणे

आपल्या नशिबी आले होते.

 

कोरोना काळा पूर्वी  आपल्याला बाहेर कुठेही व कधीही फिरण्याची मुभा होती परंतु या कोरानाकाळात पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्यांसारखी आपली अवस्था झाली होती. आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडून हिरावून घेतले होते. एखादया नातेवाईकाचे निधन झाले तरीही त्यांच्या अत्यंविधीसाठी सामील होता येत नव्हते. इतक्यात त्या व्यक्तिस कोरोना असल्यास त्यांचे अंत्यविधी देखील करण्याची परवानगी नव्हती. या काळात माणसांना आपल्या माणसांची किंमत कळली.


कुठे आहे तुमची संपत्नी ?
कुठे आहे तो आयुष्यभर कमावलेला पैसा ?
कुठे आहेत ती नाती ?
मरण इतक पोरक आणि बेवारस असेल,
नर जगतानां माज कशासाठी ?


खरच, आपले आयुष्य आपल्या हाती नाही, त्यामुळे येईल त्या दिवसाचे दु: बाजूला सारून दिवस सुखकर करून जगावा हा विचार कोरोनाने दिला.
पैसा झाडाला लागत नाही या म्हणीचा अर्थ या कोरोना काळातच उलगडला. नोकरी धंदयाची पुरी वाट लागली होती,| अनेकांना तर आपले व्यवस्थाय बंद करून घरात बसावे लागले होते, या काळात नोकरी आयुष्यभर जगण्यासाठी लागणारा पुरेपूर पैसा किती महत्वाचा आहे याची जाणीव झाली. ' फर्स्ट एड ' म्हणजेच '' आजीबाईचा बटवा ' हा शब्द या काळात खूफ महत्त्वाचा ठरला.


ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणखी दणकट होण्यास मदत झाली. मानवाचे शरीर स्वच्छ असावेच पण त्याचप्रमाणे मनही निरोगी राहावे हे महत्त्वाचे आहे हे कोरोनाने पटवून दिले. त्याचप्रमाणे कोणत्याही, आजार कमी लेखून त्याकडे दुर्लक्ष करू नये ही बाब किती गंभीर असून त्याचे आपल्या स्वास्थावर काय परिणाम होऊ शकतात, याचे पूरेपूर उदाहरण दिले. कठीण समय येता अशा अनेक साथींचे आजार येता सरकारी दवाखानाच कामास येतो या बाबी यावेळी जनतेने अनुभवल्या. दवाखाने, डॉक्टर, परिचारिका, औषधे, इंजेक्शन यांचा पुरेपुर तुटवडा देखील कोरोनाने उघड पाडला. या अशुभ काळात काही चांगल्या सवयी अंगिकारल्या गेल्या, सार्वजनिक ठिकाणी मुखपटट्या वापरणे, वारंवार हात धुणे, शिंकण्या- थुंकण्या- खोकण्याच्या योग्य सवयी या सवयीं मुले एक फायदाच झाला म्हणायचा. कोरानामुळे मानसिक आरोग्याच्या सेवा किती तोकड्या आहेत त्याचप्रमाणे मानसोपचारतज्ज यांची उणीव या साथीने दाखवून दिली. याच काळात मानसोपचारांची मनुष्याला किती गरज आहे हे उमगले.


जुन्या काळापासूनच साथरोगशास्त्र असे एक वेगळे शास्त्र आहे. पण त्याला वलय नाही. आवडीने या क्षेत्राकडे कुणीही वळत नाही. हि भावना किती चुकीची आहे हे या साथीने लक्षात आणून दिली. घरात सतत असल्यामुळे किती वेळ वाया जातो आणि कुठे जातो हे कळले आणि त्यामुळे वेळेच नीट व्यवस्थीत नियोजन केल तर सार काही शक्य आहे हे लक्षात आले. संयम, सहनशीलता,  माणुसकी, स्वच्छता यांसारख्या अनेक गोष्टींचे नियोजन आर्थिकदृष्ट्या दूरदृष्टी ठेवून करणं किती महत्त्वाचे आहे याची कोरोनाने  जाणीव करून दिली. साधारणतः लोक बाहेरचे खाणे पसंत करतात पण बाहेरच्या खाण्याने पैसा तर जातोच पण त्याचबरोबर आरोग्याची हानी असे दुहेरी नुकसान होते याची तीव्रतेने जाणीव झाली. कोरोनाने शेजारधर्म कसा सांभाळायचा  हे शिकवले, केवळ शिकवलेच नाही तर तसे वागायला भाग पाडले. अडी-अडचणीत नातेवाईकांशी शेजारी पाजारी  पहिले धावून येतात, त्यामुळे त्यांच्याशी छोट्या छोट्या कारणावरून न भांडता

एकमेकांना समजून घेऊन आनंदाने शेजारधर्म सांगाळण किती महत्वाचे आहे पटवून दिले. शहरात बंदी असल्यामुळे माणसे आपल्या मातीत राहावयास  गेले आणि त्यामुळे शेतीत रस घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. तात्पुरती चोख राहणाऱ्यांनासुद्धा  शेती करता येते ते समजले. शिवाय भविष्यात नोकरी नाहीच मिळाली तर शेती तर करू शकतो याबाबत आत्मविश्वास वाढला. शेतकरी शेतात किती कष्ट करून आपले व अवघ्या जगाचे पोट भरतात याची प्रचिती आली. शाळा सुद्धा बंद होत्या, त्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय लागत नव्हती, ज्ञानाचा धडा मिळत नव्हता, हा झरा अखंड वाहणे फार महत्वाचे आहे. याची जाणीव कोरोनाने करून दिली.

 

कोरोनाने जगण्याचा नवा मंत्र दिला तो म्हणजे कितीही मोठी समोर उभी ठाकली तरी त्या संकटांना घाबरता धाडस दिले. मुंबईत जगण्यासाठी लागणारे कौशल्य कोरोनाने दाखवून दिले. कोरोनाने मुखपट्ट्या वापरणे किती महत्वाचे आहे  हे सांगितले. एक गोष्ट माहित पडली. नोकरी आज  आहे, उदया नाही त्यामुळे नोकरी अथवा अन्य कोणत्याही बाबीवरून अहंकार न बाळगता आपल्या पदावरून दुसऱ्याला  कमी लेखू नये आजपर्यंत आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले नव्हते पण मात्र या कोरोनाच्या काळात आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर अधिक भर दिला. कोरोनाने लहान- मोठा, गरीब- श्रीमंत हे भेदभाव संपवले आपण मनुष्य आहोत हे बिंबवले. थोड तंत्रज्ञान काय अवगत केलं स्वतःला पृथ्वीचे बादशाह समजू लागलो. पण निसर्गा समोर आपण शुल्लक आहोत . डोळ्यांना दिसणारा एक विषाणु अवघ्या मानवजातीचा विध्वंस करू शकतो. आपल्या दृष्टीने हा एक विषाणू असू शकतो पण निसर्गाच्या दृष्टीने हा विषाणू म्हणजे धरतीवरचा कचरा साफ करण्यासाठी पाठवलेला अधिकारी होता. कोरानातून शिकण्यासारख खूप काही होत, त्यातील प्रमुख म्हणजे कठीण परिस्थितीत जिद्दीने  सामोरे जाणे. आयुष्यात पळत राहण्यापेक्षा थोड थांबून सुख कसं शोधायचं हे कोरोनाने शिकवले. निसर्गाचा आदर कसा करायचा. त्याचबरोबर समतोल राखणे फार महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून दिले. केवळ चिंता, विचार व्यक्त करता  ते  प्रत्यक्षात आणण्यास भाग पाडले.

 

कोरानामुळे पैसा महत्वाचा नसून माणुसकीही तितकीच महत्त्वाची आहे हे पटवून दिले. आपले छंद पूर्ण करण्यास वेळ मिळाला. नवीन छंद जोपासले गेले. कामाच्या तणावापासून दूर असल्याने आराम व योग्य झोप  मिळाल्याने दवाखान्यातील गर्दी ओसरली गेली. आरोग्य, संपन्न सुदृढ राहण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. ती राखली अशा अनेक आजारांना आळा बसतो याचा अनुभव घेतला. दरवर्षी हवामान बदलामुळे ताप, सर्दी, खोकला  ठरलेला नियमा पण या काळात घेतलेल्या खबरदारीमुळे  दक्षतेमुळे आरोग्याच्या बाबतीतआपण अधिक सजग झालो आहोत.

 

थोडक्यात कोरोगाने आपल्याला आत्मनिर्भर बनवले. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय मोडीस काढली. स्वावलंबी होण्यास शिकवले. अनिश्चित भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे, बचत करणे अशा बाबींकडे गांभियाने पाहण्यास शिकवले. आपले स्वास्थ्य आपल्या हाती आहे ही मुख्य शिकवण दिली. खरंच कोरोनाने भूतो भविष्यती" अशी अनुभूती दिली.